Tuesday, January 13, 2009

विधी अधिकाऱ्यांच्या नेमणुकीला अखेर मुहूर्त!

मुंबई पोलिस ः 68 पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीचे काम सुरू

न्यायालयीन कामकाजात पोलिसांना मदत करण्यासाठी विधी अधिकाऱ्यांच्या कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या नेमणुकीला अखेर मुहूर्त लाभला. मुंबई पोलिस दलात 68 पदांसाठी 387 उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरू झाले असून, येत्या पंधरवड्यात हे विधी अधिकारी पोलिसांना विविध प्रकरणांत कायदेशीर सल्ला देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. पोलिस दलात विधी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची ही प्रक्रिया गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित होती.
न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांत पोलिसांना कायद्यातील बारकाव्यांचा पुरेसा अभ्यास नसल्याने अनेक प्रकरणात गुन्हेगार निर्दोष सुटण्याचे प्रकार घडतात. गुन्हेगारांच्या पथ्यावर पडणारे हे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने 2006 मध्ये पोलिसांच्या मदतीला विधी अधिकारी आणि विधी सल्लागारांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. राज्यभरात 471 विधी अधिकारी आणि विधी सल्लागार नेमण्याची ही योजना मुंबईत तांत्रिक अडचणींमुळे तब्बल दोन वर्षे प्रलंबित होती. राज्यातील अन्य पोलिस आयुक्तालये आणि जिल्हा अधीक्षक कार्यालयांना विधी अधिकारी आणि विधी सल्लागार देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंबईत असलेल्या 68 पदांसाठी सबंध राज्यातून सुमारे तीन हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी सर्व बाबींची पूर्तता करणाऱ्या 387 उमेदवारांना गुन्हे शाखेने मुलाखतीसाठी पाचारण केले आहे. मुंबईत प्रत्येक सहायक पोलिस आयुक्तांना एक विधी अधिकारी, उपायुक्ताला विधी सल्लागार, अतिरिक्त आयुक्त आणि सहपोलिस आयुक्तांना "अ' श्रेणीतील विधी सल्लागार; तर पोलिस आयुक्तांसाठी मुख्य विधी सल्लागार, अशी पदे भरण्यात येणार आहेत. या अधिकाऱ्यांना त्यांच्या दर्जाप्रमाणे 15 ते 28 हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाणार आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या या मुलाखती येत्या 10 जानेवारीपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर लगेचच या अधिकाऱ्यांची 11 महिन्यांसाठी नेमणूक केली जाणार आहे. पोलिस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त या अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा दर तीन महिन्यांनी आढावा घेणार आहेत. असमाधानकारक काम असलेल्या विधी अधिकाऱ्याचे कंत्राट वाढविले जाणार नाही. अशा प्रकारे एखाद्या विधी अधिकाऱ्याची मुदत फक्त तीनदाच वाढविण्यात येणार आहे. मुंबई पोलिस दलात पहिल्यांदा नेमण्यात येणारे हे विधी अधिकारी एखाद्या प्रक
रणात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यापासून आरोपीविरुद्ध चार्जशिट दाखल करीपर्यंत पोलिसांना मदत करतील. याशिवाय न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी सरकारी वकिलांकडे पाठपुरावा करण्याचे कामही या अधिकाऱ्यांकडे असेल. "मॅट' आणि "कॅट'मध्ये प्रलंबित प्रकरणांतही ते पोलिसांना मदत करणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

(sakal-2 jan)

कसाबच्या कोठडीत नेमक्‍या अधिकाऱ्यांनाच प्रवेश

14 दिवसांची कोठडी : पोलिसांना मोबाईल नेण्यास बंदी

मुंबई हल्ल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेला अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्या कोठडीत फक्त गुन्हे शाखेच्या ठरावीक पोलिस आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. त्याच्या कोठडीत पोलिसांना मोबाईल फोन नेण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली असून, यामागे कसाबचे छायाचित्र कोणालाही काढता येऊ नये, असा हेतू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिली.
सध्या गुन्हे शाखेच्या युनीट-3 च्या पोलिस कोठडीत असलेल्या कसाबला पोलिस आयुक्तालयातच असलेल्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. 12 गुन्हे दाखल असलेल्या कसाबला आतापर्यंत तीन गुन्ह्यांत 14 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. डी. बी. मार्ग पोलिस ठाण्याच्या स्कोडा गाडी चोरीच्या गुन्ह्यात त्याला 6 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. ही कोठडी संपताच त्याला अन्य गुन्ह्यांत अटक करून नव्या गुन्ह्यात अटक केली जाण्याची शक्‍यता आहे.
कसाबला ठेवलेल्या कोठडीत पहिल्या दिवसापासूनच अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कसाब असलेल्या कोठडीत यापूर्वी नीरज ग्रोवर हत्याप्रकरणातील आरोपी दक्षिणात्य अभिनेत्री मारिया सुसायराज हिला ठेवण्यात आले होते. कोठडीत असलेल्या मारिया सुसायराजचे छायाचित्र त्या वेळी काहींनी काढले. मारियाचे हे छायाचित्र आठ हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्नही झाल्याचे समजते. असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी कसाब असलेल्या कोठडीत चौकशीसाठी जाणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुळातच मर्यादित लोकांना प्रवेश असलेल्या या कोठडीत जाणाऱ्या प्रत्येक पोलिस व अधिकाऱ्याच्या येण्या-जाण्याची नोंदणी करण्यात येत असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.

कसाबच्या कोठडीत नेमक्‍या अधिकाऱ्यांनाच प्रवेश

14 दिवसांची कोठडी : पोलिसांना मोबाईल नेण्यास बंदी

मुंबई हल्ल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेला अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्या कोठडीत फक्त गुन्हे शाखेच्या ठरावीक पोलिस आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. त्याच्या कोठडीत पोलिसांना मोबाईल फोन नेण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली असून, यामागे कसाबचे छायाचित्र कोणालाही काढता येऊ नये, असा हेतू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिली.
सध्या गुन्हे शाखेच्या युनीट-3 च्या पोलिस कोठडीत असलेल्या कसाबला पोलिस आयुक्तालयातच असलेल्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. 12 गुन्हे दाखल असलेल्या कसाबला आतापर्यंत तीन गुन्ह्यांत 14 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. डी. बी. मार्ग पोलिस ठाण्याच्या स्कोडा गाडी चोरीच्या गुन्ह्यात त्याला 6 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. ही कोठडी संपताच त्याला अन्य गुन्ह्यांत अटक करून नव्या गुन्ह्यात अटक केली जाण्याची शक्‍यता आहे.
कसाबला ठेवलेल्या कोठडीत पहिल्या दिवसापासूनच अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कसाब असलेल्या कोठडीत यापूर्वी नीरज ग्रोवर हत्याप्रकरणातील आरोपी दक्षिणात्य अभिनेत्री मारिया सुसायराज हिला ठेवण्यात आले होते. कोठडीत असलेल्या मारिया सुसायराजचे छायाचित्र त्या वेळी काहींनी काढले. मारियाचे हे छायाचित्र आठ हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्नही झाल्याचे समजते. असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी कसाब असलेल्या कोठडीत चौकशीसाठी जाणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुळातच मर्यादित लोकांना प्रवेश असलेल्या या कोठडीत जाणाऱ्या प्रत्येक पोलिस व अधिकाऱ्याच्या येण्या-जाण्याची नोंदणी करण्यात येत असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.

Friday, January 2, 2009

पाकिस्तानातील डझनभर अतिरेकी मुंबई पोलिसांच्या हिटलिस्टवर

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची योजना आखणारे पाकिस्तानातील एक डझनहून अधिक अतिरेकी मुंबई गुन्हे शाखेच्या हिटलिस्टवर आहेत. यात अतिरेक्‍यांना प्रशिक्षण देण्यापासून प्रत्यक्ष कट आखणारे तसेच त्यांना अर्थपुरवठा करणाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात असलेला अतिरेकी महम्मद अजमल कसाब याच्या चौकशीत या अतिरेक्‍यांची तसेच त्यांना मदत करणाऱ्यांची नावे पुढे आल्याचे हा अधिकारी म्हणाला.
26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी हॉटेल ताज, नरिमन हाऊस व हॉटेल ट्रायडंट येथे घातपात घडविणाऱ्या अतिरेक्‍यांचे पाकिस्तानमध्ये विविध ठिकाणी असलेल्या त्यांच्या काही कमांडरसोबत संभाषण सुरू होते. हे संभाषण भारतातून परदेशात झाले असल्याने त्यासंबंधीचे ठोस पुरावे हाती येण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. या संभाषणाबाबत भारतीय कंपन्यांकडून आवश्‍यक ती माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र पाकिस्तानकडून यासंबंधी माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत. या प्रकरणातील अतिरेक्‍यांना लष्करी प्रशिक्षण देणारे त्यांचे ट्रेनर, त्यांना अर्थपुरवठा करणारे, कट रचणारे तसेच हल्ल्याच्या वेळी प्रत्यक्ष संवाद साधणाऱ्यांची नावे पोलिसांना अतिरेकी कसाबच्या चौकशीतून मिळाली आहेत. हे सगळे पाकिस्तानमध्ये राहणारे असल्याचेही हा अधिकारी म्हणाला. मुंबई हल्ला प्रकरणाचे आरोपपत्र या महिन्यात न्यायालयात दाखल होईल. अतिरेकी कसाब याचे वकीलपत्र घेण्यासाठी मुंबईतील ऍडव्होकेट लाम यांच्याव्यतिरिक्त बंगाल येथील तिघा वकिलांची फर्मही पुढे आली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेले आरोपी फहीम अन्सारी व साबाउद्दीन अहमद यांच्या चौकशीत हल्ल्यासंबंधी महत्त्वाची माहिती मिळाली असून आणखी एक संशयित आरोपी इमरान शहजाद याची कस्टडी 3 जानेवारीला घेण्यात येणार असल्याचेही हा अधिकारी म्हणाला. अतिरेक्‍यांनी पाकिस्तानच्या सागरी हद्दीतून मुंबईकडे येण्यासाठी वापरलेल्या कुबेर बोटीचा मालक विनोद मसाणी याची पोरबंदर येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने अद्याप चौकशी सुरू आहे.


(sakaal,1stjanuary 2009)

नोकर, सुरक्षा रक्षकही चोरट्यांचे खबरे?

मोठे जाळे उघडकीस ः पोलिसांकडून खबऱ्यांचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 1 ः अनेक वर्षे तुमच्याकडे काम केले असल्याने तुमचा ज्यांच्यावर गाढ विश्‍वास आहे असा तुमच्या घरातील नोकर, मोलकरीण अथवा इमारतीचा सुरक्षारक्षक एखाद्या चोरट्यांच्या टोळीचा खबरी असण्याची दाट शक्‍यता आहे. दचकलात ना? तुमची ही शंका कदाचित खरीदेखील ठरू शकेल. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वांद्रे, खार आणि सांताक्रू झ परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोघांना अटक केली. या घरफोड्यांनी वर्षभराच्या काळात वीसहून अधिक घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लुबाडल्याचे उघडकीस आले. चोरी करण्यासाठी श्रीमंतांची घरे शोधण्याकरिता त्यांनी खबरे ठेवल्याचे तपासात स्पष्ट झाले असून चोरीच्या ऐवजातील ठराविक रक्कम या खबऱ्यांना दिली जात होती, अशी माहिती गुन्हे शाखेचे सह-पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.
वांद्य्राच्या बुलक रोड परिसरात सी ब्रीझ इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या साहिदा मुश्‍ताक काथावाला (41) यांच्या घरात 2 नोव्हेंबरला पहाटे दोघा घरफोड्यांनी चोरी केली होती. घरात एकट्याच राहणाऱ्या साहिदा यांचे हातपाय बांधून चोरट्यांनी घरातील सहा लाख रुपयांचा ऐवज चोरी केला होता.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या युनिट- 10 च्या पोलिसांनी 25 डिसेंबरला तेजबहाद्दूर छेडीलाल मौर्या ऊर्फ विजय (23, रा. जुहू गल्ली) व शरीफ रमझान शेख (22, रा. जुहू) यांना अटक केली. या दोघांच्या चौकशीत त्यांनी मे - 2007 पासून आतापर्यंत वीसहून अधिक घरफोड्या केल्याचे कबूल केले.

घरफोडीत निष्णात असलेल्या या दोघा चोरट्यांचे वांद्रे, खार, सांताक्रूझ परिसरात खबऱ्यांचे मोठे नेटवर्क असल्याचे उघडकीस आले आहे. एखाद्या घरातील जुना नोकर, इमारतीचा सुरक्षारक्षक, मोलकरीण या चोरट्यांना एखाद्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती तसेच त्याच्या घरातील सदस्यांची अचूक संख्या सांगत असत. त्यामुळे दोन्ही घरफोड्यांना एखाद्या घरात चोरी करायला सोपे जात होते. पोलिस या चोरट्यांच्या खबऱ्यांचा शोध घेत असून काहींची चौकशी सुरू असल्याचेही गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त मारिया यांनी सांगितले. तेजबहाद्दूर मौर्या बहुमजली इमारतीत ड्रेनेजच्या पाईपवरून चढण्यात आणि क्षणात उतरण्यात निष्णात आहे. काथावाला यांच्या घरातून चोरलेल्या सहा लाखांच्या ऐवजापैकी पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. रात्री घरफोड्या केल्यानंतर दिवसा हे दोघेही चोरटे मोटारसायकलवरून वाटसरूंच्या बॅगा चोरण्याचेही काम करीत. त्यांच्यावर बॅगचोरीचे सात गुन्हे दाखल असल्याचेही मारिया यांनी सांगितले.

राज्यातील पोलिस ठाणे इंटरनेट कनेक्‍टीवीटीने जोडणार

राज्यातील 994 पोलिस ठाण्यांना इंटरनेट कनेक्‍टीवीटीने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नव्या वर्षात कार्यान्वित केला जाणार आहे. ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंटच्या क्राईम ऍण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टिम ( सीसीटीएनएस) या प्रकल्पांतर्गत पोलिस खात्यात "ई गव्हर्नन्स' योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता महाराष्ट्र पोलिसांनी केंद्र सरकारकडे यंदा तीनशे कोटी रुपयांची मागणी केली आहे.
सरकारी कार्यालयांतील कामकाज संगणकीकरणाद्वारे करण्यासाठी ई गव्हर्नन्स योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेनुसार पोलिस दलातही टप्प्याटप्प्याने आमूलाग्र बदल करण्यात येत आहेत. पोलिस खात्यातील कामकाजाचे संगणकीकरण करण्यासाठी राज्य पोलिस दल "नाईन- एएस' हा प्रकल्प "पायलट प्रोजेक्‍ट ' म्हणून राबविणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्‍यक असणारी संपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सुरवातीच्या काळात मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, नाशिक सारख्या पाच पोलिस आयुक्तालये आणि विशेष शाखांत या प्रकल्प राबविला जाईल. यानंतर दुसऱ्या टप्प्यात तो राज्यभर राबविला जाईल. या प्रकल्पाद्वारे राज्यातील दोन लाख पोलिसांच्या कामकाजाचे नियोजन करण्यात येणार आहे. कॉमन इंटिग्रेटेड पोलिस ऍप्लिकेशन ( सीपा) या प्रकल्पानुसार राज्यातील 10 पोलिस आयुक्तालये आणि 33 जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांना संगणकीकरणाने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला. नंतर याच प्रकल्पात काही सुधारणा करून तो क्राईम ऍण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टिम ( सीसीटीएनएस) असा करण्यात आला. हा प्रकल्प केंद्र सरकार पाच वर्षांच्या कालावधीत राबविणार आहे. दोन हजार कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी राखून ठेवला आहे. येत्या काळात देशभरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या प्रत्येक गुन्ह्याच्या तपासाची माहिती "ऑनलाइन' उपलब्ध होण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक पोलिस ठाणे एकमेकांशी संगणकाने जोडले जावे यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात किमान पाच संगणक व पाच प्रिंटर मिळण्याची मागणी महाराष्ट्र पोलिसांनी केंद्राला एका प्रस्तावाद्वारे केली आहे. सध्या पोलिस दलात ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून क्राईम ऍण्ड क्रिमिनल इन्फो सिस्टिम ( सीस
ीआयएस) व "फॅक्‍ट्‌स- फाइव्ह' हे दोन प्रकल्प सुरू आहेत. सीसीआयएस द्वारे गुन्ह्याचा एफआयआर ते चार्जशीट दाखल करण्यापर्यंतची माहिती उपलब्ध करून देण्यात येते तर फॅक्‍ट फाइव्ह द्वारे राज्यातील प्रत्येक गुन्हेगाराच्या बोटांच्या ठशांचे रेकॉर्ड ठेवण्याचे काम सुरू आहे. हे काम पुण्यात सीआयडी क्राईम हा विभाग करीत आहे. सध्या राज्यातील प्रत्येक पोलिस आयुक्तालय आणि जिल्हा अधीक्षकांशी संगणकीकरणाद्वारे पत्रव्यवहार केला जातो. ई. गव्हर्नन्स प्रत्येक गावापर्यंत पोहण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या राज्य सरकारची ब्रॉडबॅन्ड कनेक्‍टिव्हिटी येत्या वर्षभरात प्रत्येक गावात पोचेल. त्यांच्याच मदतीने राज्यातील प्रत्येक पोलिस ठाणे एका क्‍लिकच्या अंतरावर येणार असल्याची माहिती तरतूद विभागाचे सहाय्यक पोलिस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी दिली. पोलिस खात्यासाठी आवश्‍यक साधनसामग्रीची मागणी करण्यासाठी "ई टेंडरींग' ची पद्धतही लवकरच सुरू करण्याचा मानस असल्याचे तरवडे म्हणाले.

( sakal- 2nd january 09 )
----------------------
पोलिस दलातील ई गव्हर्नन्सची सद्यःस्थिती
- मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या पोलिसांच्या स्वतंत्र वेबसाईट्‌स कार्यान्वित.
- महाराष्ट्र पोलिसांची www.mahapolice.gov.in ही वेबसाइट कार्यरत. सातत्याने अपडेट असलेल्या या वेबसाइटला अवघ्या काही महिन्यांतच वेबसाइटला 2 लाख जणांनी भेट दिली.
- मुंबई पोलिसांची www.mumbaipolice.com ही वेबसाइट सर्वांत अपडेट. या वेबसाइटला भेट देणाऱ्यांची संख्या 18 लाख 11 हजार 989
- मुंबईसह राज्यात संगणकीकरणाद्वारे पत्रव्यवहाराला अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद नाही.
- संगणकाद्वारे पत्रव्यवहारासाठी ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यांत कुशल मनुष्यबळाची आवश्‍यकता.

Thursday, January 1, 2009

यापेक्षा दुर्दैव ते कसले?

उल्हास फाटक ः जलतरणपटू विनोद घाडगे यांच्या मृत्यूमुळे वरळीवर शोककळा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 30 ः "आजवर त्याने केलेल्या जलतरणातील सगळ्या विक्रमांना मी त्याच्या सोबत होतो. मी सोबत असल्यावर विक्रम यशस्वी होतो, असं त्याला नेहमी वाटायचं. काल रात्रीही मी नेहमीप्रमाणे त्याच्या सोबतच होतो. बोटीपासून अवघ्या दीड मीटर लांबून तो सपासप पाणी कापत गेटवेच्या दिशेने पुढे पुढे जात होता अन्‌ अचानक मासेमारीकरिता टाकलेल्या जाळ्यात तो अडकला. जाळे लावलेल्या कोळ्याने लांबून आरोळी ठोकली तेव्हा लक्षात आलं. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. बोट वळवून मागे येईपर्यंत बोटीत असलेल्या काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पाण्यात उड्याही मारल्या; मात्र "त्या' पाच-सात मिनिटांत सारे काही संपले होते. माझ्या नजरेसमोर त्याला मृत्यू आला; मात्र त्याच्यापासून अवघ्या काही अंतरावर बोटीत असलेले आम्ही काहीच करू शकलो नाही. आजवर शेकडोंना पोहायला शिकविणाऱ्या विक्रमवीर जलतरणपटूचा अंतही पाण्यातच होणे यापेक्षा दुर्दैव ते कसले,' अशी भावना विक्रमवीर जलतरणपटू विनोद घाडगे यांचे जिवलग मित्र उल्हास फाटक यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जलतरणपटू विनोद घाडगे यांनी शिष्य धनंजय कांबरेकर यांच्यासह धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया असे 36 किलोमीटरचे अंतर पोहण्याचा संकल्प सोडला होता. या संकल्पपूर्तीसाठी ते मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास तीन लहान बोटी, एका मोठ्या लॉंचवर मित्र, आप्तेष्ट, सहकारी असा तब्बल साठ जणांचा लवाजमा घेऊन काल धरमतर येथे गेले होते. यानंतर करंजा येथे प्रीतम या कोळी मित्राकडे त्यांनी जेवण केले. मध्यरात्री दोन वाजता घाडगे यांनी धरमतरच्या किनाऱ्यावरून धनंजय कोंबरेकर याला पाण्यात उडी मारायला लावली. वीस मिनिटांनी पाण्यात उडी मारून धनंजयला गाठता येईल असा त्यांचा विचार होता. त्यानुसार दोन बोटी आणि लॉंच धनंजयसोबतच पुढे पाठविण्यात आल्या.
विक्रीकर खात्यात अधिकारी असलेल्या विनोद घाडगे यांच्या बोटीत त्यांच्या खात्याचे अतिरिक्त आयुक्त आर.आर.पाटील, मित्र उल्हास फाटक आणि अन्य मित्रही होते. 2 वाजून 21 मिनिटांनी त्यांनी पोहण्यासाठी समुद्रात उडी मारली. दोन तास पोहून त्यांनी अंतरही पार केले. या काळात श्री. पाटील यांनी त्यांना दोन वेळा खायलाही दिले. तर फाटक त्यांना प्रोत्साहन देत होते. गडद काळोखात बोटीच्या मागे ते अवघ्या दीड ते दोन मीटर अंतरावरून पोहत होते. याच वेळी बोट अचानक मासेमारीसाठी जाळे टाकलेल्या ठिकाणावर शिरली. सर्वत्र गडद अंधार असल्याने समुद्रात मासेमारीसाठी टाकलेले जाळे कोणालाच दिसले नाही. साधारण शंभर मीटर अंतरावर असलेल्या एका कोळ्याने जोरात आरोळी ठोकून तेथे जाळे असल्याचे सांगितले. तोपर्यंत बोट हे जाळे पार करून पुढे गेली. मात्र बोटीवर असलेल्या फाटक यांच्या मनात पुढच्याच क्षणात विनोद घाडगे यांचा विचार आला. घाडगे यांना पाहण्यासाठी म्हणून बोटीतील सगळे मागे वळले तर ते समुद्रात कुठेच दिसत नव्हते. बोट मागे वळवून त्यांच्याकडे जाईपर्यंत जाळ्यात अडकून तो अंतिम श्‍वास घेत होता. हे सांगताना फाटक यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.

---------

वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
जलतरणपटू घाडगे यांच्या मृत्यूची बातमी समजताच ते राहत असलेल्या वरळीच्या फ्लोरा परिसरातील गोदावरी इमारतीवर शोककळा पसरली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उरणच्या शासकीय रुग्णालयातून त्यांचे शव वरळी येथील निवासस्थानी आणण्यात आले. पत्नी उमा (39), मुलगा सिद्धांत (8 वर्षे ) व मुलगी निर्मिती (11 वर्षे ) यांच्यासह तीन बंधू आणि आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूच्या वृत्तानंतर त्यांचे शिष्य, सहकारी, मित्र व चाहत्या वर्गाने वरळी परिसरात एकच गर्दी केली होती. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

छंदासाठी नोकरी बदलली
मूळचे सातारा येथील राहणारे घाडगे यांनी दादरच्या रानडे रोडवर फुले विकून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर इंग्रजी विषयात एम.ए.ची पदवी मिळविली. याच वेळी त्यांनी आपला पोहण्याचा छंदही जोपासला. नंतर याच छंदाने त्यांना राष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून दिली. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक झाल्यानंतर त्यांनी काही काळ विशेष शाखेत नोकरीही केली. पोहण्याच्या छंद अधिकाधिक चांगल्या प्रकारे जोपासता यावा यासाठी त्यांनी विक्रीकर विभागात अधिकारी पदावर नोकरी स्वीकारली. त्यांचे मोठे बंधू बाळासाहेब पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. बाळासाहेब, विनोद आणि गणेश या तिन्ही भावंडांनी चार वर्षांपूर्वी जिब्राल्टरची खाडी विक्रमी वेळात पोहण्याचा विक्रम केला होता.