Sunday, October 26, 2008

राज ठाकरे अटक

20 october arrest of mns chief raj thakre.
घटनाक्रम
- पहाटे 2.30 वा. - राज ठाकरे यांना अटक.
- सकाळी 9.00 वा. - वांद्रे न्यायालयाच्या आवारात राजसमर्थक जमायला सुरुवात.
- सकाळी 11.30 वा. - वैद्यकीय चाचणीसाठी राज ठाकरे यांना बीकेसी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
- दुपारी 1.15 वा. - न्यायालयाबाहेर मनसे व समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने. पोलिसांनी जमाव हटविला.
- दुपारी 1.35 वा. - विशेष सरकारी वकील माजिद मेमन व रोहिणी सालियन न्यायालयात दाखल.
- दुपारी 1.54 वा. - राज्य राखीव पोलिस दल तैनात.
- दुपारी 2.23 वा. - दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल. पोलिसांवर तुफान दगडफेक, जमावावर लाठीचार्ज.
- दुपारी 2.30 वा. - पश्‍चिम द्रुतगती महामार्ग अडविणाऱ्या जमावावर अश्रूधुराचा मारा.
- दुपारी 2.35 वा. - शीघ्र कृती दलाचे जवान पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर तैनात. जमाव हटविण्याकरिता बळाच्या प्रयोगाचे आदेश.
- दुपारी 2.39 वा. - मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोलिसांच्या गाडीतून न्यायालयात दाखल, तत्पूर्वी न्यायालय परिसर रिकामा केला.
- दुपारी 3.40 वा. - राज यांच्याबाबत वांद्रे न्यायालयाची सुनावणी.
- दुपारी 4.25 वा. - ठाणे पोलिसांनी ताबा घेतलेल्या राज यांना घेऊन पोलिस डोंबिवलीकडे रवाना.



राज यांच्यावर 20 डिसेंबरपर्यंत भाषणबंदी
पोलिसांचे आदेश : पत्रकार परिषदही घेता येणार नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 21 ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर येत्या 20 डिसेंबरपर्यंत भाषणबंदी आणणारा आदेश पोलिसांनी दिला आहे. राज यांनी मोर्चे, धरणे, निदर्शने तसेच पत्रकार परिषदांत सहभाग घेऊ नये, जातीय तेढ निर्माण करणारी प्रक्षोभक विधाने करू नयेत अथवा त्याकरिता त्यांनी मुंबईत फिरूही नये, असे या आदेशात म्हटले आहे.
रत्नागिरी दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात परप्रांतीयांना केलेल्या मारहाणप्रकरणी अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भाषणबंदीचे आदेश काढले. या आदेशानुसार 20 डिसेंबरपर्यंत राज यांना पक्षाध्यक्ष म्हणून कोणत्याही वृत्तपत्र तसेच वृत्तवाहिन्यांना मुलाखती अथवा निवेदने देता येणार नाहीत. तसेच सार्वजनिक मालमत्तेला नुकसान होईल असे कोणतेही कृत्य करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त (अभियान) अमर जाधव यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या अटकेनंतर शहरात लहान-मोठे असे 60 अनुचित प्रकार घडले. याप्रकरणी 12 गुन्हे दाखल करण्यात आले असून एक हजार जणांना अटक करण्यात आली आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये याकरिता राज्य राखीव पोलिस दलाच्या 25 प्लाटून, 2 कंपनी, 1 रॅपिड ऍक्‍शन फोर्सची कंपनी तसेच उपलब्ध असलेले संपूर्ण पोलिस बळ ठिकठिकाणी बंदोबस्ताकरिता ठेवण्यात आले होते. वांद्रे वगळता शहरात कुठेच गटागटाने हिंसाचाराच्या घटना घडल्या नसल्याचेही जाधव यांनी या वेळी सांगितले.

No comments: