नक्षलवादी हल्ले रोखण्यासाठी नक्षलग्रस्त राज्यांमध्ये माहितीचे जाळे; तसेच या राज्यांच्या नक्षलवादविरोधी कारवायांमध्ये समन्वय असणे आवश्यक असल्याचे मत गृहमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
नक्षलग्रस्त राज्यांचे गृहमंत्री, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना गृहमंत्री पाटील यांनी समन्वयाबरोबरच संयुक्त कारवाई होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यासंबंधीची गुप्तचर विभागाकडून येणारी माहितीही परस्परांना मिळावी; तसेच केंद्राकडे केल्या जाणाऱ्या मागणीत सुसूत्रताही आवश्यक असल्याचे पाटील या वेळी म्हणाले. नक्षलवादी हल्ले हे केवळ राज्यांची समस्या नसून ती देशाची समस्या आहे. या राज्यांनी गुप्तचर यंत्रणा बळकट करायला पाहिजे, असा आग्रह छत्तीसगडचे गृहमंत्री ए. कनवार यांनी बैठकीत धरला. नक्षलवादी हल्ले रोखण्यासाठी समन्वयाने नियोजन करायला हवे, असेही ते या वेळी म्हणाले. या बैठकीला गृहराज्यमंत्री नसीम खान, डॉ. नितीन राऊत , गृहखात्याच्या अपर मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार, पोलिस महासंचालक एस. एस. विर्क, आंध्र प्रदेशचे पोलिस महासंचालक एस. यादव; तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओरिसा येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
(sakaal,8th june)
No comments:
Post a Comment