लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मुंबई पोलिस सज्ज झाले असून मतमोजणीनंतर कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी तब्बल सात हजार पोलिस शहरात तैनात ठेवण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त राज्य राखीव पोलिस दलाच्या 37 तुकड्या पोलिसांच्या मदतीला राहणार आहेत. शहरात असलेल्या संवेदनशील मतमोजणी केंद्रांवर पोलिसांचे विशेषत्वाने लक्ष राहणार आहे. निकालानंतर शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी ही दक्षता घेण्यात येत आहे. आतापर्यंत पोलिसांना विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांसह दोन हजार 600 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
(sakal,15th may)
No comments:
Post a Comment